ब्रह्ममुहूर्तावर उठायचे फायदे ?

इमेज
          रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्ममुहूर्त होय. साधारणत ०३:४० ते ०५:३० दरम्यानचा कालावधी यावेळी ज्याप्रकारे पृथ्वी फिरते. आणि त्यामुळे जे काही मूलभूत बदल घडतात. तेव्हा तुमची शरीर प्रणाली एक विशिष्ट पद्धतीने काम करते. आणि नैसर्गिकरित्या शरीरातील पीनियल ग्रंथि मधून स्त्रावणारे मेलाटोनिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होत असते. आणि ब्रह्मामुहूर्ताच्या काळात पीनियल ग्रंथि मधून हा स्त्राव सर्वाधिक प्रमाणात होत असतो. ज्यामुळे आपले शरीर यंत्रणेला सहज स्थैर्य प्राप्त होऊन शरीर आणि विचार यांचा सुंदर मेळ घालता येतो. आणि विचारांवर नियंत्रण मिळवता येते. आणि मन स्थिर करता येते. ही अशी वेळ आहे, की ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने घडवू शकतात.            लोकांना सतत होणार्‍या अनेक समस्यांचे कारण आपण ती जाणीव गमावली आहे. की सृष्टीच्या कसे तालात रहावं. आपण निसर्गाशी असलेला तारतम्य गमावलं आणि आपल्याला असं वाटतंय की हेच आपलं मूळ स्वरूप आहे. जर तुम्ही सृष्टीच्या तारतम्यात राहाल तर तुम्ही पण पहाटे 3:40 च्या सुमारास जागे व्हालं. जर तुम्ही जागृत असाल तर ? जर तुम्ही ब्रह्मम

वधू-वर गुण जुळवणी नेमकं काय असतं ?


           प्राचीन भारतीय संस्कृतीत ऋषिमुनींनी मानवी जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी समाजात काही नियम बनवले होते. त्यातील एक नियम कुंडली जुळवणे किंवा गुण जुळवणे होय. हिंदू धर्मात पत्रिका जुळवणे विवाहबंधनाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गुण जुळवणे हे भावी वधू-वरांच्या भविष्यातील सुखसमृद्धीचा वेध घेण्याचा एक मार्ग आहे.  हे फक्त जोडी किंवा अनुकूलतेच्या बाबतीत सांगत नाही. तर विवाह बंधनात बांधल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या आत्म्याची अध्यात्मिक, शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक अनुकूलतेच्या बाबतीत देखील माहिती देते. पत्रिका जुळवणीने आपण नात्यांची स्थिर-अस्थिरता तसेच दिर्घ आयुष्याची वाटचाल कशाप्रकारे असेल याची माहिती प्राप्त करू शकतो. 

          वैदिक ज्योतिषाच्या आधारे बघितले तर कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आठ प्रकारचे गुण आणि अष्टकुटांची मिलन असते. हे गुण: वर्ण, वश्य, तारा, योनी, गृह मैत्री, गण,  भकूट, आणि नाडी या सर्व जुळवणी नंतर ३६ अंक असतात. विवाहाच्या वेळी कुंडली जुळताना ३६ पैकी १८ गुण जुळले तर विवाह यशस्वी राहील असे मानले जाते. हे १८ गुण स्थिती, स्वास्थ, दोष, प्रवृत्ती, संतान इत्यादी संबंधित असतात. गुण जुळवण्याच्या या प्रक्रियेत नाडी कुट जुळवणीला प्राधान्य दिले जाते. ती अनुकूल असेल तर शुभ गुण जुळवणी मानली जाते.
          एकंदरीत बघता आज मानवी जीवनाचा प्रवास कितीही  आधुनिकतेकडे झुकता असला तरी आपण पूर्वीपासून चालत आलेल्या रुढी परंपरेला मानतो. तसे बघता ज्योतिषशास्त्र हे एक विज्ञान आहे. हे आपल्या कुंडलीमध्ये उपलब्ध असलेल्या ग्रह,  गुण, दोष यांच्या मदतीने सांगते की आपले भविष्य कसे राहील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात ?

ब्रह्ममुहूर्तावर उठायचे फायदे ?