ब्रह्ममुहूर्तावर उठायचे फायदे ?

इमेज
          रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्ममुहूर्त होय. साधारणत ०३:४० ते ०५:३० दरम्यानचा कालावधी यावेळी ज्याप्रकारे पृथ्वी फिरते. आणि त्यामुळे जे काही मूलभूत बदल घडतात. तेव्हा तुमची शरीर प्रणाली एक विशिष्ट पद्धतीने काम करते. आणि नैसर्गिकरित्या शरीरातील पीनियल ग्रंथि मधून स्त्रावणारे मेलाटोनिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होत असते. आणि ब्रह्मामुहूर्ताच्या काळात पीनियल ग्रंथि मधून हा स्त्राव सर्वाधिक प्रमाणात होत असतो. ज्यामुळे आपले शरीर यंत्रणेला सहज स्थैर्य प्राप्त होऊन शरीर आणि विचार यांचा सुंदर मेळ घालता येतो. आणि विचारांवर नियंत्रण मिळवता येते. आणि मन स्थिर करता येते. ही अशी वेळ आहे, की ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने घडवू शकतात.            लोकांना सतत होणार्‍या अनेक समस्यांचे कारण आपण ती जाणीव गमावली आहे. की सृष्टीच्या कसे तालात रहावं. आपण निसर्गाशी असलेला तारतम्य गमावलं आणि आपल्याला असं वाटतंय की हेच आपलं मूळ स्वरूप आहे. जर तुम्ही सृष्टीच्या तारतम्यात राहाल तर तुम्ही पण पहाटे 3:40 च्या सुमारास जागे व्हालं. जर तुम्ही जागृत असाल तर ? जर तुम्ही ब्रह्मम

मंदिरात नारळ का फोडतात?


         भारतीय संस्कृती मंदिरात नारळ फोडून देवाला वंदन केले जाते. पण आपल्यापैकी बहुतेक जणांना हे माहिती नाही, कि मंदिरात नारळ का फोडतात. त्यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारण आहेत.
          धार्मिक कारण बघितले तर प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत देव-देवतेच्या प्रसन्न करण्यासाठी पशुंची बळी देण्याची प्रथा होती. अश्या प्रकारच्या अमानुष पद्धतीला पर्याय म्हणून , ऋषी मुनींनी नारळ फोडण्याची पध्दत आणली. त्यामागे त्यांचा उद्देश असा होता. कि मानवाने आपल्या आयुष्यातील अहंकार , मत्सर, द्वेष यांचा त्याग करुन एक चांगला मार्ग निवडावा.
          वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर असे समजते कि नारळातील प्रसादरुपी खोबरे आपल्या शरीरासाठी उत्कुष्ट दर्जाचे इंधन म्हणून काम करते. त्यात मेद, प्रथिने, पोट्याशियम, क्लोरिन आणि  जीवनसत्त्व हे भरपूर प्रमाणात मिळते.हे प्रमाण इतर फळांच्या तुलनेत जास्त असल्यामुळे, आपल्या शरीराला वात, पित्त, मधुमेह, यांसारख्या आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या संस्कृतीत नारळाला, आपल्या दैनंदीन जीवनाचा एक भाग म्हणून समावेश केला गेला आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात ?

वधू-वर गुण जुळवणी नेमकं काय असतं ?

ब्रह्ममुहूर्तावर उठायचे फायदे ?